Dipak Askand

Friday, September 30, 2011

कोणी गेलं म्हणुन...

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं..

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं

कोणी गेलं म्हणुन.......

Wednesday, September 7, 2011

पुन्हा पुन्हा....हे कुठपर्यंत चालणार?

पुन्हा दिल्लीत बोंम्बस्फोट झाला,
पुन्हा मृत्युचे तांडव झाले,
आता पुन्हा निषेध होणार, पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटी, पुन्हा मदतीच्या घोषणा,
पुन्हा चोंकशी समित्या, पुन्हा त्यात घोटाळे होणार, पुन्हा त्याला राजकीय रंग मिळणार,
पुन्हा पाकिस्तानला ताकीद देणार, काही दिवसांनी पुन्हा सगळे विसरणार,
पुढचा स्फोट झाल्यावर या स्फोटची उजळनी होणार,

ज्यांचे नातेवाइक जाणार त्यांचे जीवन भराचे झालेले नुकसान कधीही भरून नाही येणार,
वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहणार, कधीतरी त्यावर निकाल लागणार,
कदाचित आरोपी तोपर्यंत सापडलेले असणार, कदाचित त्यांना फाशी ची शिक्षा होणार,
ते पुन्हा राष्ट्रपतिंकड़े अपील दाखल करणार, त्यालाही बरीच वर्षे लागणार,
तोपर्यंत आरोपी मजेत तुरुगात हाय-सिक्यूरिटी मध्ये राहणार,
तोपर्यंत अजुन कित्येक बोंम्बस्फोट झालेले असणार
त्यांचीही चोंकशी चालू होणार, पुन्हा पुन्हा पुन्हा तेच होत राहणार .....

ठरवा आता हे कोणी बदलायचे? की आपण वाट पाहत राहणार आपल्या घरातले कोणी बळी जाणार याची ???